scorecardresearch

भारताच्या नसानसांमध्ये लोकशाही; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

Pm Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( एएनआय छायाचित्र )

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लोकशाही ही भारताच्या नसानसांमध्ये वाहत असून ती आपली संस्कृती आहे. गेल्या अनेक शतकांपासून लोकशाही आपल्या कार्यशैलीचे अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया – द मदर ऑफ डेमोक्रसी’ या पुस्तकाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, की नैसर्गिकरीत्याच आपला समाज लोकशाहीवादी आहे. लोकशाहीची मातृभूमी या नात्याने आपण तिच्या मूल्यांबाबत नेहमी चर्चा केली पाहिजे आणि जगालाही ज्ञान दिले पाहिजे. यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल. इंडियन काऊंसिल ऑफ हिस्टॉरिकल रीसर्चने हे पुस्तक संपादित केले असून त्यात जुन्या काळापासून देशात असलेल्या लोकशाही मूल्यांबाबत लेखांचा त्यात समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 03:26 IST