नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोळा वर्षांची मुलगी दागिने घालून मध्यरात्रीही रस्त्यावरून फिरू शकते, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी टीका केली असून हा केवळ जुमला असल्याचे म्हटले आहे.

   राज्यातील महिलांना रोज कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे गृहमंत्र्यांना ठाऊक नसावे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी  काही बातम्या ट्विटरवर टाकल्या असून कानपूरमध्ये तीन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीस गेल्याचे म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित असल्याचा दावा केला होता.