पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘मोदी सरकारने कधीही मतांच्या राजकारणासाठी लोकानुनय करणारे निर्णय घेतले नाहीत. त्याऐवजी जनहितार्थ काम करत देशाला राजकीय स्थैर्य मिळवून दिले,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योग क्षेत्रातील संघटना ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’च्या (असोचेम) वार्षिक सोहळय़ात ‘इंडिया अ‍ॅट १०० पाथ वे टू इन्क्ल्यूझिव्ह अँड सस्टेनेबल ग्लोबल ग्रोथ’ या कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघभावना (टीम इंडिया) ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामुळेच गेल्या नऊ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. निर्णय घेताना सरकारसमोर कायम देशहित असते. कोणत्याही क्षेत्राचा विकास व्हावा, हा हेतू असतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public interest works by government people votes asserts amit shah ysh
First published on: 29-03-2023 at 00:02 IST