खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंग अलीकडच्या काही दिवसांपासून फरार आहे. पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा देशभरात शोध घेत आहेत. तरीही, अमृतपाल सिंग पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. पोलिसांनी अमृतपालच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. पण, त्यांना सोडण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहे. शिख संघटन जत्थेदार अकाल तख्तने अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना २४ तासांत सोडण्यात यावं, असा इशारा दिला आहे.

शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे ( एसजीपीसी ) प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी सांगितलं की, “सरकारने २४ तासांत अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना सोडून द्यावं. जर सरकारने त्यांना सोडलं नाहीतर, एसजीपीसी गावा-गावांत जाऊन लोकांना जागरूक करेल.”

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
muzaffar beg kashmir loksabha
काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
Shirpur sub-divisional officer
शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

हेही वाचा : थरकाप उडवणारी घटना! घरात मांस न आणल्याने पतीने गाठली क्रूरता, तीन मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरला अन्…

“पोलिसांनी ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क साधल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे,” अशी माहिती धामी यांनी दिली आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, अमृतपाल सिंग हरियाणातील बलजीत कौर या महिलेच्या घरी थांबला होता. तिला तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर बोलताना बलजीतने सांगितलं की, “मी अमृतपालला ओळखत नव्हती. माझी पप्पलप्रीत बरोबर इंन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. अमृतपालला पप्पलप्रीतच घरी घेऊन आला होता. दोघांनी जेवण केलं. अमृतपालने आपल्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला, तेव्हाची त्याची ओळख पटली.”

“जायच्या आधी मोबाईलमध्ये…”

हेही वाचा : “मी पंतप्रधान मोदींसंदर्भात…”, ‘ते’ ट्वीट व्हायरल होताच खुशबू सुंदर यांचं स्पष्टीकरण; काँग्रेसवरही साधला निशाणा!

“अमृतपालने माझ्या मोबाईलचा वापर केला होता. दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठले. अमृतपाल घरातच होता, तर पप्पलप्रीत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर दोघेही दीड वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले. जाण्यापूर्वी अमृतपालने मोबाईलमध्ये काहीतरी शोधलं होतं,” असं बलजीत कौरने म्हटलं.