पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली. त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे. असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. या शब्दांची एक लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. संसदेच कामकाज किंवा चर्चेदरम्यान हे शब्द वापरता येणार नाही, असे संसेच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Sharad pawar on Udyanraje bhosale lok sabha election
“राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ”हा नवीन भारताचा नवीन शब्दकोष आहे”, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. ”सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – शिवसेना-भाजपाची युती होणार? केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले “पहिला फोन कोणी करायचा यावर…”