नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर राहुल गांधी यांनी बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यातील निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य पध्दतीने पार पाडलेली नाही. काँग्रेस आयोगाच्या कारभाराबाबत साशंक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. ‘मी स्पष्टपणे सांगितले होते की महाराष्ट्रातील निवडणुकीत काहीतरी चूक झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल आम्ही साशंक आहोत. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अचानक जवळजवळ एक कोटी नवे मतदार समाविष्ट झाले, ही बाब खटकणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा राहुल गांधींनी मांडला होता. हे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत.

people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे

हेही वाचा >>> इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे मतदारयाद्या विरोधी पक्षांना दाखवल्या पाहिजेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या लोकांची नावे आणि पत्ते पाहण्याची मागणी काँग्रेसने केली होती. पण, निवडणूक आयोगाने ही माहिती देण्यास नकार दिला, असे राहुल गांधी म्हणाले.

मतदारयाद्यांमध्ये पारदर्शकता आणण्यास निवडणूक आयोग का नकार देत आहे? आम्हाला यादी न देण्यामागे त्यांचा काय उद्देश असू शकतो, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. मतदारयाद्यांसंदर्भातील विरोधी पक्षांचे आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने खोडून काढले आहेत.

निवडणूक आयोगाने मतदारांची यादी दिली तर सगळा प्रश्न मिटेल. आम्ही तपासून बघू की महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमध्ये काही गोंधळ आहे का? कामामध्ये पारदर्शकता आणणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. तसे न केल्याने आयोगाच्या प्रतिमेलाच धक्का लागतो! – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, आयोगाला नोटीस

निवडणूक आचारसंहिता नियमावलीत नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देणाऱ्या काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या युक्तिवादांचा विचार केला आणि १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सुनावणी निश्चित केली.

Story img Loader