पीटीआय, नवी दिल्ली

गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरुद्ध अमेरिकेने केलेल्या लाचखोरीचे आरोप नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांची एकत्रित यंत्रणा सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने बुधवारी केला. तर, केंद्र सरकार अदानींचे संरक्षण करत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी अदानी यांच्या अटकेची मागणी केली. अदानी समूहाने आरोप नाकारल्याबाबत विचारले असता राहुल म्हणाले की, ‘‘तुम्हाला काय वाटते अदानी आरोप स्वीकारतील? कोणत्या जगात राहत आहात? स्वाभाविकच ते आरोप नाकारतील.’’

अदानींविरोधातील आरोपांवर संसदेत तपशीलवार चर्चा केली जावी आणि सेबीसह अन्य तपास यंत्रणांनी या आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली. महेश जेठमलानी आणि मुकुल रोहतगी या वकिलांनी अदानींच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्या हा आरोपाचे गांभीर्य करण्याचा प्रयत्न असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केला. ‘‘हा क्षण भारताच्या संस्था आणि उच्चपदस्थ भारतीयांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम भोगायला लावणारा आहे,’’ असे ते म्हणाले. ‘‘मोदी-अदानी यंत्रणेने आज सकाळी मोठा कायदेशीर तोफखाना सुरू केला. अदानी यांच्यावर अशा देशामध्ये आरोप झाले आहेत जेथील यंत्रणांना ते धाकदपटशा दाखवू शकत नाहीत किंवा त्या पोखरूही शकत नाहीत,’’ असे रमेश यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.

हेही वाचा >>>अदानींकडून लाचखोरीच्या आरोपांचे खंडन; अमेरिकेतील न्यायालयांत दाखल आरोपपत्रात नावे नसल्याचा समूहाचा दावा

वकिलांकडून अदानींसाठी युक्तिवाद

बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी म्हटले होते की, ‘‘आरोपपत्रामध्ये एकूण पाच आरोप ठेवण्यात आले असून गौतम अदानी किंवा सागर अदानी यांच्यावर लाचखोरीचा आरोप कुठेही नाही.’’ तर ज्येष्ठ वकील आणि भाजपचे खासदार महेश जेठमलानी यांनीही माध्यमांशी बोलताना अदानी यांच्यावरील आरोप किरकोळ असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांच्याविरोधातील पुरावेही अस्पष्ट असल्याचा दावा त्यांनी केला होता.

अदानींना अटक केली पाहिजे. आम्ही म्हटल्याप्रमाणे शेकडो लोकांना किरकोळ आरोपांवरून अटक केली जाते आणि या सद्गृहस्थांविरोधात हजारो कोटींच्या लाचखोरीच्या आरोपावरून अमेरिकेत आरोपपत्र दाखल केले जाते. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. हे सरकार त्यांना संरक्षण देत आहे.- राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

Story img Loader