खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये असून यात्रेची सोमवारी (३० जानेवारी) सांगता होत आहे. आज (२९ जानेवारी) राहुल गांधी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आगामी राजकीय वाटचालविषयी भाष्य केले आहे. माझ्या डोक्यात दोन-तीन चांगल्या कल्पना आहेत, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> भारत जोडो यात्रेने नेमकं काय साधलं? राहुल गांधी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
aap-leader-aatishi
‘भाजपात या, नाहीतर महिन्याभरात तुरुंगात जा’, ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा खळबळजनक आरोप

थोडा वेळ गरजेचा आहे, पुढील काळात…

कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. ही यात्रा आता संपत आहे. त्यामुळे आता देशात पूर्व ते पश्चिम अशी आणखी एखाद्या यात्रेचे आयोजन करणार का? असे राहुल गांधी यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी सूचक विधान केल आहे. “आताच भारत जोडो यात्रा समाप्त झाली आहे. या यात्रेत लोक हजारो किलोमीटर चालले आहेत. त्यामुळे थोडा वेळ गरजेचा आहे. पुढील काळात काय होते ते पाहुयात,” असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>> राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा, अशी कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

…नाही त्याबाबत विचार करूयात

“ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी पार पडली. मा या यात्रेचा प्रभाव संपूर्ण देशात आहे. ही यात्रा म्हणजे एक दृष्टीकोन आहे. देशासाठी ही एक जगण्याची पद्धत आहे. काँग्रेस पक्ष तसेच आमच्या कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय पातळीवर या यात्रेचा प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी एखादी यात्रा काढायची की नाही त्याबाबत विचार करुयात. माझ्याकडे आणखी दोन-तीन चांगल्या कल्पना आहेत. त्यामुळे बघुयात,” असे विधान राहुल गांधी यांनी केले.