दिल्लीनंतर पंजाबमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नजरा आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. त्यासाठी पक्षाकडून सातत्याने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात देवाकडे साकडं घातलं आहे. “मी देवावर विश्वास ठेवतो आणि मंदिरातही जातो. ते पुढे म्हणाले की लोक देवासमोर काहीतरी मागतात आणि मीही मागतो. मी देवाकडे फक्त दोनच गोष्टी मागतो. पहिली म्हणजे, मला भारताला लवकरच जगातील नंबर १ देश बनवायचा आहे आणि दुसरे म्हणजे, जोपर्यंत मी भारताला नंबर १ देश म्हणून पाहत नाही तोपर्यंत मला मरण देऊ नका.” अरविंद केजरीवाल यांच्या या विधानावर सोशल मीडिया यूजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अश्विनी उपाध्याय नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिले आहे की, जर तुम्हाला भारताला खरोखरच विश्वगुरू बनवायचे असेल तर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा आणि भ्रष्टाची १००% संपत्ती जप्त करण्याचा कायदा करा आणि १० ते ५० वर्षे कारावासाची शिक्षा करा. मनमोहन नावाच्या युजरने लिहिले की, ‘सर्वात आधी मोफत गोष्टी देणे बंद करा आणि लोकांना रोजगार द्या.’ राकेश कश्यप नावाचा ट्विटर वापरकर्ता लिहिले आहे की, ‘या आम आदमी पार्टीच्या लोकांनी देवासाठी काय केले आहे? अरविंद केजरीवाल देवाची माफी मागायला निघणार आहेत. मनीष सिसोदिया जेव्हा रामजन्मभूमीवर हॉस्पिटल आणि विद्यापीठ बांधणार होते तेव्हा तुम्ही कुठे होता. आजकाल वीज आणि पाण्यासोबतच तुमचे लोक दिल्लीतील लोकांना दंगल फुकट देत आहेत.’

प्रवीण दीक्षित नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिलं आहे की, ‘दिल्लीत दारू स्वस्त करत तुम्ही देशाला नंबर वन बनवण्याचे स्वप्न पाहत आहात. तुम्ही अप्रतिम आहात सर. तुम्ही भगवंत मान यांच्यापेक्षा चांगली कॉमेडी करत आहात.’ प्रवीण कुमार सिंह नावाच्या युजरने लिहिले की, ‘अरविंद केजरीवाल यांना स्वत:ला अमर करायचे आहे कारण जोपर्यंत त्यांच्यासारखे नेते असतील. आपला देश कधीच नंबर वन होऊ शकणार नाही.’