राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग मिटल्यानंतर काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासह बंडखोरांनी उपस्थित केलेल्या तक्रारी ऐकण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांचा समावेश आहे. राजस्थानात अविनाश पांडे यांच्या जागी माकन यांना प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. Press Releases regarding appointment of G.S. Rajasthan & 3 Member Committee approved by Hon'ble Congress President 1. Appointment of General Secretary In-charge of Rajasthan 2. Three Member Committee to oversee & follow up the smooth resolution of recent issues in Rajasthan pic.twitter.com/mqW97Qa0Ad — AICC Communications (@AICCMedia) August 16, 2020 राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयावर आभार व्यक्त केले आहेत. पायलट यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "राजस्थानात समन्वय स्थापित करण्यासाठी आज अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्या रुपात तीन सदस्यीय समिती नियुक्त केल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाचे आभार. मला पूर्ण विश्वास आहे की, समितीच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानात संघटनेला एक नवी दिशा मिळेल." राजस्थान में समन्वय स्थापित करने के लिए आज श्री @ahmedpatel, श्री @kcvenugopalmp, श्री @ajaymaken के रूप में तीन सदस्यीय कमेटी नियुक्त करने के लिए कांग्रेस नेतृत्व का आभार। मुझे पूर्ण विश्वास है कि कमेटी के मार्गदर्शन में राजस्थान में संगठन को एक नई दशा और दिशा मिलेगी। — Sachin Pilot (@SachinPilot) August 16, 2020 पायलट यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं, "अजय माकन यांची राजस्थान प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन. आपल्या नियुक्तीमुळे निश्चितच राजस्थान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांना बळ मिळेल. उज्वल भविष्याच्या आशेसह मी अजय माकन यांचे वीरभूमी राजस्थानात स्वागत करतो." श्री @ajaymaken जी को राजस्थान प्रभारी महासचिव नियुक्त किए जाने पर हार्दिक बधाई। आपकी नियुक्ति से निश्चित ही राजस्थान कांग्रेस के कार्यकर्ताओं की उम्मीदों को बल मिलेगा। उज्ज्वल भविष्य की कामना के साथ मैं अजय माकन जी का वीर भूमि राजस्थान में स्वागत भी करता हूँ। — Sachin Pilot (@SachinPilot) August 16, 2020 राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते मंगळवारी जयपूरला परतले. यावेळी काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना सगळ्या तक्रारी दूर केल्या जातील, असे आश्वास देण्यात आले होते.