Shivraj Singh Chouhan Rajya Sabha Speech on MSP : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आज शेतमालाच्या एमएसपीच्या (मिनिमम सपोर्ट प्राईस अथवा हमीभाव) मुद्द्यावरून मोठा गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी सरकारला प्रश्न विचारला की ते शेतकऱ्यांना एमएसपी कधी देणार? त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. चौहान म्हणाले, “शेतकरी हे आमच्यासाठी ईश्वरासमान आहेत. शेतकऱ्यांची सेवा करणं हे आमच्यासाठी पूजा करण्यासारखं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची ईश्वरासमान सेवा करतात.” चौहान यांनी यावेळी एमएसपीसाठी गठित केलेल्या समितीचा उल्लेख केला.

शिवराज सिंह चौहान म्हणाले, “एमएसपीबाबत तीन प्रमुख उद्दीष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून आपण एक समिती गठित केली आहे. एमएसपी प्रदान करणे आणि त्यासंबंधीची प्रणाली पारदर्शक करणे हे आपलं पहिलं उद्दीष्ट आहे. तर शेतमालाच्या किंमतीसाठी अधिक स्वायत्तता देणे हे दुसरं उद्दीष्ट आहे. कृषी वितरण प्रणालीसाठी सूचना मिळवणं हे या समितीसमोरचं तिसरं उद्दीष्ट आहे.”

eknath shinde wrote letter to 10th and 12th exam students
विद्यार्थ्यांनो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा .. !! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पत्र
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ABVP opposes Chandrakant Patil demands quality education
चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला ‘अभाविप’कडून तीव्र विरोध, ‘कॅरी ऑन योजना’ गुणवत्तेसाठी मारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सकारात्मक असणे दुर्दैवी
Farmers led by Kapil Patil met thane collector to proper compensation for road affected farmers
रस्तेबाधित शेतकऱ्यांना लवकर मोबदला द्या, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?

“जिलबीसारखं गोल गोल फिरवू नका, स्पष्ट शब्दांत उत्तर द्या”; विरोधक आक्रमक

शिवराज सिंह चौहान म्हणाले, “आतापर्यंत एमएसपीसंदर्भात आमच्या २२ बैठका पार पडल्या आहेत. यासाठी आपण जी समिती नेमली आहे त्या समितीकडून ज्या शिफारसी येतील त्यावर आम्ही जरूर विचार करू.” यावर सपा खासदार रामजी लाल सुमन म्हणाले, “जिलबीसारखं गोल गोल फिरवण्यापेक्षा एमएसपीवर तुम्ही थेट व स्पष्ट उत्तर द्या. एमएसपी कधी लागू होणार ते काही तुम्ही सांगितलंच नाही, ते आधी सांगा.”

रामजी लाल म्हणाले, “तुम्ही केवळ शेतकऱ्यांना ईश्वर म्हणताय, परंतु तुमचा व शेतकऱ्यांचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही. एमएसपीवर उत्तर देणं सोडून तुम्ही पळून जाऊ शकत नाही.” यावर कृषीमंत्री म्हणाले, “एमएसपीचा दर सातत्याने वाढवण्यात आला आहे. तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहात. शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने सहा सूत्रीय रणनिती आखली आहे.”

Shivraj Singh Chauhan
शिवराज सिंह चौहान

हे ही वाचा >> Om Birla : “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं

हमीभाव कधी मिळणार?

शिवराज सिंह चौहान म्हणाले, आपण शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी होईल, उत्पादन कसं वाढवता येईल, यासाठी अनेक उपाययोजाना राबवल्या आहेत. तरीदेखील काही लोक आम्हाला शेतकरीविरोधी म्हणत आहेत. खरंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींइतका शेतकऱ्यांचा विचार दुसरा कोणताही नेता करत नाही. समितीचा अहवाल आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना उचित हमीभाव देणार आहोत. त्यासंबंधीच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.

Story img Loader