लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे देशाचे अविभाज्य भाग आहेत, असा पुनरुच्चार नेपाळ सरकारने रविवारी पुन्हा एकदा केला. तसेच भारताला या प्रदेशातील सर्व रस्ते बांधकाम थांबवण्याचे आवाहन केले. सीमेचा प्रश्न मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने एक निवेदन जारी केल्यानंतर एक दिवसानंतर नेपाळकडून हे वक्तव्य आले आहे. भारतीय दूतावासाने म्हटलं होतं की, नेपाळच्या सीमेवर भारताची भूमिका सर्वमान्य, सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे, तसेच नेपाळ सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिपुलेख परिसरात रस्त्याचा विस्तार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर काही दिवस झाल्यानंतर नेपाळने लिपुलेख नेपाळचा भाग असल्याचा दावा केला आहे. ३० डिसेंबर रोजी उत्तराखंडमधील हल्दवानी येथे भाजपाने आयोजित केलेल्या निवडणूक सभेला संबोधित करताना मोदींनी घोषणा केली होती की त्यांचे सरकार उत्तराखंडमधील लिपुलेखमध्ये बांधलेल्या रस्त्याचे आणखी रुंदीकरण करत आहे.

More Stories onनेपाळNepal
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop unilateral construction of roads nepal tells india over border dispute hrc
First published on: 17-01-2022 at 14:03 IST