नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पाठय़पुस्तकांतील मजकूर मनमानी आणि अतार्किक पद्धतीने वगळल्याने नाराज झालेल्या सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी ‘एनसीआरटी’ला पत्र लिहिले आहे. त्यात इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या सर्व पाठय़पुस्तकांच्या मुख्य सल्लागारपदावरून आपल्याला मुक्त करण्याची मागणी या दोघांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
तर्कशुद्धीकरण किंवा तर्कसंगत करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली या पाठय़पुस्तकांतील काही मजकूर वगळला आहे. त्यामुळे ही पुस्तके विकृत झाली असून, शैक्षणिकदृष्टय़ा अकार्यक्षम बनली असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 10-06-2023 at 05:18 IST