CJI DY Chandrachud: भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य केले. “सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे न्यायालय म्हणून आपली भूमिका भविष्यातही तशीच कायम ठेवली पाहीजे. पण याचा अर्थ त्यांनी संसदेतील विरोधी पक्षाची जागा घेऊ नये”, असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात आयोजित केलेल्या सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन (SCAORA) च्या पहिल्या परिषदेला ते संबोधित करत होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले, “मागच्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने न्यायदानाचा एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्शही आपण गमावता कामा नये. जेव्हा समाजाचा विकास आणि भरभराट होत असते, तेव्हा एक असा समज निर्माण होतो की, फक्त मोठ्या लोकांनाच न्याय मिळतो. पण आमचे न्यायालय असे नाही, ते लोक न्यायालय आहे आणि हीच भूमिका आपल्याला भविष्यातही जपली पाहिजे. तसेच लोकांचे न्यायालय असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा नाही की, आपण संसदेतील विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.”

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”

हे वाचा >> CJI Chandrachud : “सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा”, डी. वाय. चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस

जेव्हा एखादा निर्णय कुणाच्या बाजूने लागतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय ही एक अप्रतिम संस्था आहे, असे काही लोक मानतात. तर जेव्हा निर्णय विरोधात जातो, तेव्हा हेच लोक सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने शंख फुंकतात. मला वाटते की, आजच्या काळात ही अशी फूट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असेही डीवाय चंद्रचूड यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मला यात धोका दिसतो. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल काय येतो, यावरून तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेकडे पाहू शकत नाही. वैयक्तिक खटल्यांचा निकाल एकतर तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात लागू शकतो. न्यायाधीशांना प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

हे ही वाचा >> बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञानाच्या आधारावर हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जसे की, खटल्यांसाठी ई-फायलिंग, केस रेकॉर्ड्सचे डिजिटायझेशन, खंडपीठाच्या सुनावणीदरम्यान होणाऱ्या युक्तीवादाचे स्पीच टू टेक्स्ट तंत्रज्ञान वापरून मजकूरात रूपांतर करणे आणि न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणे, अशा काही गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. तसेच थेट प्रक्षेपणाचे काही तोटे असले तरी न्यायव्यवस्थेसाठी हे परिवर्तनकारी ठरले आहे, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.

Story img Loader