काँग्रेस अविश्वासू आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने कधीच पुरी केलेली नाहीत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केले. भाजप चार राज्यांमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. काँग्रेसबद्दल लोकांमध्ये असंतोष असल्याने त्यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा मोदींनी केला. आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न मोदींनी भाषणात केला. काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केले, पण आदिवासींना काय दिले, असा सवाल केला. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतंत्र आदिवासी मंत्रालय स्थापन केले, असा दावा त्यांनी केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कार्याची स्तुती मोदींनी केली. मध्य प्रदेशसाठी त्यांनी खूप काही केल्याचे मोदींनी सांगितले.