दिल्ली सरकारवर नियंत्रण आणण्याच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेत्यांची भेटी-गाठी घेत आहेत. शनिवारी ( २७ मे ) केजरीवाल यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. देशात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही ( केंद्र सरकार ) काम करून देत नाही,” असा आरोपही केसीआर यांनी केला.

Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “गुजरातचे लोक…”

“हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे”

“आम्ही नरेंद्र मोदींना अध्यादेश मागे घेण्याची मागणी करतो. आमचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा आहे. मोदी सरकारने दिल्लीतील नागरिकांचा अपमान केला आहे. हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ,” असं केसीआर यांनी म्हटलं.

“८ वर्षानंतर दिल्लीतील लोकांना न्याय मिळाला होता”

अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. “८ वर्षे दिल्लीतील लोकांना अपंग करून ठेवलं. ८ वर्ष लढाई लढल्यानंतर ११ मेला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लोकांच्या हक्काचा निर्णय दिला. त्यामुळे दिल्लीतील लोकांना न्याय मिळाला होता. पण, ८ दिवसांच्या आताच केंद्र सरकारने अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला,” असा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा : VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला ‘हे’ १० मुख्यमंत्री गैरहजर, म्हणाले…

“…तर न्यायासाठी लोकांनी कोणाकडं जायचं”

“देशाचे पंतप्रधानच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नाहीत. तसेच, अध्यादेश आणून निर्णय बदलतात. तर, न्यायासाठी लोकांनी कोणाकडं जायचं. देश कसा चालणार? हे चुकीचं आहे,” असं केजरीवाल म्हणाले.