इमारतीच्या २५ व्या माळ्यावरुन खाली पडून १४ वर्षाच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही दोन्ही मुलं नेमकी खाली कशी पडली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची वडील कामानिमित्त मुंबईला होते. घरात दोन्ही भावांसोबत आई आणि बहीण होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दोन्ही मुलं खाली पडली आणि जागीच मृत्यू झाला.

विजय नगर पोलीस ठाण्यच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “रात्री १ वाजण्याच्या सुमारास सत्यनारायण आणि सुर्यनारायण हे दोघे भाऊ इमारतीच्या २५ व्या माळ्यावरुन खाली पडले आणि जागीच मृत पावले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत”. दोघेही नववीत शिकत होते.