सिक्कीम राज्याने भारताची मान जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. राज्यभरात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे.  25 विविध देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली आहे.

ब्राझील, डेन्मार्क आणि इक्वेडोर यांना रौप्य पदकाचा मान मिळाला आहे. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल 66 हजार शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं असून, राज्याच्या भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झालेली आहे. इतर देशांसाठी सिक्कीमने घालून दिलेला पायंडा हा आदर्शवत असल्याचंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. 2016 साली सिक्कीमने शेतीमधून रासायनिक खतं आणि किटकनाशकं यांचा वापर पूर्णपणे बंद केला. 15 ऑक्टोबररोजी रोम मध्ये झालेल्या सोहळ्यात सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्विकारला.