बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी ( ४ जून ) सायंकाळी कोसळला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. पूल कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधला जात होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०१४ साली पुलाची पायाभरणी केली होती. १७०० कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचा स्लॅब दोन वर्षापूर्वी कोसळला होता. या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
chandrapur crime news, son killed mother, son killed mother with axe marathi news
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
Uddhav thackeray on farmer protest
“शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी, इतका जोश चीनच्या सीमेवर दाखवला तर…”, ठाकरे गटाचा संताप

हेही वाचा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने का भिरकावला माईक? व्हिडीओ व्हायरल

नेमकं घडलं काय?

भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज येथे गंगा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. पूल गंगा नदीत कोसळल्याने पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. पूल कोसळल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

“दोषींवर कारवाई होणार”

जनता दल यूनायटेड ( जेडीयू ) चे आमदार ललित मंडल यांनी सांगितलं की, “ही दुर्दैवी घटना आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पुलाचे उद्घाटन होईल, अशी आम्हाला आशा होती. पण, अशा घटना घडत असतील, तर हा चौकशीचा भाग आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार,” अशी माहिती मंडल यांनी दिली.

हेही वाचा : VIDEO : ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकला राहुल गांधींचा व्हिडीओ, जाहिरातीसाठी किती येतो खर्च? जाणून घ्या…

“बिहारचे नागरिक कधीच माफ करणार नाही”

विरोधी पक्षनेते विजय कुमार यांनी म्हटलं की, “२०१४ साली ६०० ते ७०० कोटी रुपयांच निर्माण होणाऱ्या पुलांची किंमत १६०० कोटींवर पोहचली आहे. उच्च अधिकाऱ्यांनी कमिशनच्या माध्यमातून पैसे घेतले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारचे नागरिक कधीच माफ करणार नाही,” असं विजय कुमार म्हणाले.