केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. सकाळी निर्मला सीतारामन संसदेत आल्या. त्या बजेट सादर करताना त्यांचे आई वडीलही संसदेत आले होते.  संसदेत पोहचल्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

हे पण वाचा : Budget 2019: इलेक्ट्रिक कार घेतल्यास दीड लाखांपर्यंत करसवलत

हेही वाचा : Budget 2019: लवकरच २० रुपयाचे नाणेही चलनात येणार, निर्मला सीतारमन यांची घोषणा

अनेक घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत. लघू उद्योजकांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अति श्रीमंतांवरचा कर मोदी सरकारने वाढवला आहे. दरम्यान टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. करदात्यांबाबत बोलताना सुरूवातीलाच त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. १ रुपया, २ रूपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांचं नाणं आणलं जाणार आहे. अंध व्यक्तींना ही नाणी ओळखता येतील अशा प्रकारची नाणी असणार आहेत अशीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारात त्याबाबत नाराजी पाहण्यास मिळाली आज सकाळी ११२ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स बजेटनंतर ३३४ अंकांनी कोसळला आहे.

बजेटसाठी ११ वाजताचीच वेळ का?

ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा होती. मात्र २००१ मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवी परंपरा सुरू केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार होतं.

Live Blog

13:09 (IST)05 Jul 2019
सोनं आणि इंधन महाग होणार!

सोनं महागणार आहे कारण सोन्यावरची कस्टम ड्युटी साडेबारा टक्के करण्यात आली आहे त्यामुळे सोन्यच्या दरात वाढ होणार आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल आमि डिझेल यांच्यावरचा कर १ रुपया वाढवला आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलहीच्या किंमती वाढणार आहे.

13:05 (IST)05 Jul 2019
श्रीमंतांवरचा करदर वाढवला!

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात श्रीमंतांवरचा कर दर वाढवाला आहे. २ ते ७ कोटी चे वार्षिक उत्पन्न सरकारने करदर वाढवला आहे. २ ते ७ कोटी वर्षाचे उत्पन्नावरचा कर वाढवणार आहे. अशांना आता ३ टक्के सरचार्ज लागणार आहे

12:54 (IST)05 Jul 2019
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार पुरेसं, पॅनकार्डची गरज नाही

इन्कम टॅक्स रिटर्न  भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार कार्ड महत्त्वाचा आधार ठरणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. FM: More than 120 crore Indians now have Aadhar card, therefore for ease of tax payers I propose to make PAN card and Aadhar card interchangeable and allow those who don't have PAN to file returns by simply quoting Aadhar number and use it wherever they require to use PAN pic.twitter.com/oCarxQTzyQ— ANI (@ANI) July 5, 2019

12:44 (IST)05 Jul 2019
देश इलेट्रिक वाहनांचं केंद्र करण्याचं लक्ष्य

पर्यावरणाशी संबंधित उद्योगांना करसवलत दिली जाणार आहे. येत्या काही वर्षात भारत हा देश इलेट्रिक वाहनांचे केंद्र झाला पाहिजे असं आमचं लक्ष्य आहे. जीएसटी परिषदेकडे आम्ही या वाहनांवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणावा अशी शिफारस केली आहे. ज्या कंपन्यांची  वार्षिक आर्थिक उलाढाल ४०० कोटींपर्यंत आहे त्यांना २५ टक्के कर लागणार आहे. आधी ही मर्यादा २५० कोटीपर्यंत होती 

12:40 (IST)05 Jul 2019
डायरेक्ट टॅक्सेस ७८ टक्क्यांपर्यंत वाढ

थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही वाढ ७८ टक्क्यांपर्यंत झाली आहे. गेल्या पाच वर्षात सामान्य माणसांवरचा कराचा बोजा कमी करण्याचं आमचं लक्ष्य आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये थेट करांच्या प्रमाणात ६.३८ लाख कोटी रुपयांवरून ११.३७ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.

12:37 (IST)05 Jul 2019
देशातल्या करदात्यांचे धन्यवाद

मी देशातल्या सगळ्या करदात्यांना धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळेच देशाचा विकास होतो असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

12:35 (IST)05 Jul 2019
१, २, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नाणी येणार

१ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नाणी येणार ही नाणी अंध व्यक्तींना ओळखता येतील अशी असणार आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं

12:29 (IST)05 Jul 2019
सरकारी बँकांना ७० हजार कोटी देऊ

सरकारी बँकांना ७० हजार कोटी देऊ असंही निर्मला सीतारामन यांन जाहीर केलं आहे. गेल्या ४ वर्षात ४ लाख कोटींची वसुली झाली आहे असंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.

12:23 (IST)05 Jul 2019
१ लाख कोटींनी एनपीए कमी झाला

मागील वर्षभरात १ लाख कोटींनी एनपीए कमी झाला. सार्वजनिक बँकांना आम्ही आर्थिक मदत करणाक आहोत, देशातली बँकांची आर्थिक स्थिती सुधारू असंही सीतारामन यांनी म्हटलं आहे

12:13 (IST)05 Jul 2019
गेल्या दहा वर्षात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली

फक्त महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही योजना तयार करणं हे आमच्यापुढचं आव्हान आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशभरातल्या महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्याचं काम आम्ही करतो आहे.

12:11 (IST)05 Jul 2019
भारताच्या विकासात महिलांचा मोठा वाटा

स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की जोपर्यंत महिलांची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत जग सुधारणार नाही. या सरकारचा विवेकानंदांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत, भारताच्या विकासात महिलांचा मोठा वाटा आहे. या महिलांना प्रोत्साहन देण्याची आमची तयारी आहे.

12:08 (IST)05 Jul 2019
स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार

स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली याद्वारे तरूणांना मार्गदर्शन दिलं जाणार.

12:02 (IST)05 Jul 2019
भारत उच्च शिक्षणाचं केंद्र बनवण्याचं लक्ष्य

भारत हा देश उच्च शिक्षणाचं केंद्र झाला पाहिजे असा आमचा मानस आहे. परदेशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

12:01 (IST)05 Jul 2019
हर घर नल, हर घर जल या योजनेची घोषणा

हर घर नल, हर घर जल या योजनेच्या मार्फत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल असेही सीतारामन यांनी जाहीर केले.

11:56 (IST)05 Jul 2019
२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर

२०२२ पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचं उद्दीष्ट मोदी सरकारने ठेवलं आहे. प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं

11:49 (IST)05 Jul 2019
ग्रामसडक योजनेसाठी ८० हजार कोटींची तरतूद

ग्राम सडक योजनेसाठी ८० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात १ लाख २५ किमीच्या रस्ते निर्मितीचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

11:36 (IST)05 Jul 2019
विविध क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार

प्रत्येक क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. एफडीआयबाबत जगभरात चांगलं वातावरण नसताना भारतात चांगलं वातावरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यम क्षेत्रात एफडीआय वाढवणार असेही त्यांनी म्हटलं आहे

11:32 (IST)05 Jul 2019
३ कोटी उद्योजकांना पेन्शन दिलं जाणार

३ कोटी लघू उद्योजकांना पेन्शन दिलं जाणार ही योजनाही आम्ही आणतो आहोत असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. बँक खातं आणि आधार कार्डच्या माध्यमातून आम्ही पेन्शन योजना आणतो आहोत असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं

11:25 (IST)05 Jul 2019
सागरमाला आणि भारतमाला हे देशातले महत्त्वाचे प्रकल्प

सागरमाला आणि भारतमाला हे देशातले महत्त्वाचे प्रकल्प आहेत असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सागरमाला प्रकल्पामुळे जलमार्गांचा विकास होण्यास सुरूवात झाली आहे. तर भारतमला प्रकल्पांमुळे देशाचा विकास होणार आहे. प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत आम्ही गावं शहराशी जोडण्याचं काम केलं असंही त्या म्हटल्या.

11:18 (IST)05 Jul 2019
स्वदेशी या शब्दाला मोदी सरकारने 'मेक इन इंडिया'चं रूप दिलं

स्वदेशी या शब्दाला मोदी सरकारने मेक इन इंडियाचं रूप दिलं आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटल आहे. पायाभूत सोयी सुविधांवर अधिक खर्च करण्याची गरज आहे. उडान योजनेमुळे हवाई प्रवास सुखकर झाला असंही त्यांनी म्हटलं आहे.

11:18 (IST)05 Jul 2019
स्वदेशी या शब्दाला मोदी सरकारने 'मेक इन इंडिया'चं रूप दिलं

स्वदेशी या शब्दाला मोदी सरकारने मेक इन इंडियाचं रूप दिलं आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटल आहे. पायाभूत सोयी सुविधांवर अधिक खर्च करण्याची गरज आहे. उडान योजनेमुळे हवाई प्रवास सुखकर झाला असंही त्यांनी म्हटलं आहे.

11:15 (IST)05 Jul 2019
विकास आणि विश्वास सोबत घेऊन आमचा प्रवास

विकास आणि विश्वास या दोन मुद्द्यांच्या आधारावर आमच्या सरकारचा प्रवास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगतीपथावर पोहचला. स्वच्छ भारत योजनेला जनतेनेही चांगला पाठिंबा दिला असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

11:12 (IST)05 Jul 2019
अमेरिका आणि चीननंतर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड

मुद्रा, उज्ज्वला गॅस योजनांच्या आधारे आम्ही सामान्य माणसाच्या आयुष्याचा स्तर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. डिजिटल अर्थव्यवस्था आम्ही आणली. मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये रोजगारनिर्मिचं लक्ष्यही आम्ही ठेवलं आहे त्यामध्ये गुंतवणुकीची गरज आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. 

11:08 (IST)05 Jul 2019
नवभारताच्या निर्माणासाठी आम्ही प्रयत्न केले ते सुरूच राहणार

नवभारताच्या निर्माणासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत आणि पुढील काळातही ते सुरूच राहणार आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. विकासकामं करणाऱ्या सरकारला जनतेने पाठिंबा दिला याचा आनंद वाटतो आहे. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने अनेक कामं केली. देशभरातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न केला. यापुढेही आमचे तेच लक्ष्य असणार आहे असंही सीतारामन यांनी म्हटलं आहे. 

11:05 (IST)05 Jul 2019
निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात केली आहे त्यांनी प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा जनतेने आम्हाला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत नवभारताच्या संकल्पनेतले पहिले बजेट आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे 

10:52 (IST)05 Jul 2019
अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काही मिनिटातच अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत आणल्या गेल्या आहेत सगळ्याच खासदारांना या प्रती वाटल्या जातील काही वेळापूर्वीच या प्रती संसदेत आणल्या गेल्या आहेत. 

10:47 (IST)05 Jul 2019
कॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत पोहचल्या. त्याआधी कॅबिनेटच्या बैठकीत बजेट मांडण्यात आलं. कॅबिनेटने बजेटला मंजुरी दिली आहे आता काही वेळातच सीतारामन यांच्या भाषणाला सुरूवात होईल 

10:45 (IST)05 Jul 2019
अर्थसंकल्पाच्या दिवशी सेेन्सेक्सही वधारला

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्सही वधारला आहे. ११९ अंकांनी सेन्सेक्स वधारला आहे 

10:41 (IST)05 Jul 2019
निर्मला सीतारामन यांचे आई आणि वडीलही संसदेत दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आई सावित्री सीतारामन आणि वडील नारायण सीतारामन हे दोघेही संसदेत दाखल झाले  आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील 

10:23 (IST)05 Jul 2019
कॅबिनेट बैठकीला थोड्याच वेळात सुरूवात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत अर्थसंकल्प घेऊन पोहचल्या आहेत. ११ वाजता त्यांच्या भाषणाला सुरूवात होईल. त्याआधी कॅबिनेटने या अर्थसंकल्पाला मंजुरी द्यायची असते ही बैठक सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीसाठी पोहचले आहेत 

10:06 (IST)05 Jul 2019
अर्थसंकल्पाची पहिली प्रत राष्ट्रपतींकडे सुपूर्द

केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. त्याआधी निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ कोविंद यांना अर्थसंकल्पाची पहिली प्रत सुपूर्द करण्यात आलं आहे.