देशात भाजपाशासित सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. यादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) एक स्वायत्त संस्था असून तिचं काम करत आहे असं म्हटलं आहे. निर्मला सीतारामन अमेरिका दौऱ्यावर असून शनिवारी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला.

ईडीचा गैरवापर केला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की “ईडी एक स्वायत्त संस्था असून, ते स्वतंत्रपणे आपलं काम करतात. गंभीर गुन्ह्यांची दखल घेत ते कारवाई करत असतात. अशा अनेक कारवाया आहेत ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हातामध्ये काही प्रथमदर्शनी पुरावे असल्यानेच ईडी तिथे जाऊन कारवाई करतं”.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
state Chief Electoral Officer, warns, religion, campaigning, action, lok sabha election, code of conduct
निवडणूक आचारसंहिता काळात धर्माच्या मुद्यावर प्रचार झाल्यास कारवाई, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…

विश्लेषण : ईडी खरंच विरोधकांना लक्ष्य करते? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर

निर्मला सीतारामन यांनी यावेळी जी २० आणि त्यांच्या प्राथमिकतेवरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की “आम्ही अनेक जी २० सदस्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. अनेक आव्हानं असतानाही आम्ही अध्यक्षपद स्वीकारत आहोत. आम्हाला सर्वांसह एकत्र काम करावं लागेल”.

“पाश्चिमात्य देश पुन्हा एकदा कोळसा वापराकडे वळत आहेत. ऑस्ट्रियानेही हीच गोष्ट सांगितलं आहे. युकेमध्ये पुन्हा एकदा थर्मल युनिट्स परतले आहेत. गॅस परवडत नसल्याने किंवा उपलब्ध नसल्याने फक्त भारतच नाही, तर अनेक देशांना वीजेच्या निर्मितीसाठी पुन्हा कोळसा वापरावर अवलंबून राहावं लागत आहे,” असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

रुपयाची घसरण आणि त्यावरील उपायांसंबंधी विचारण्यात आलं असता निर्मला सीतारामन यांनी भौगोलिक आणि राजकीय तणाव यासाठी जबाबदार असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की “यावर उपाययोजना केल्या जात आहे. पण त्याचबरोबर व्यापार तूट सर्वत्र वाढत आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत”.