मागील काही दिवसांपासून देशामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये मृतांचं प्रमाण कमी आहे. सध्या करोना रुग्ण अधिक असले तरी मृतांचं प्रमाण कमी असण्यामागील मुख्य कारण लसीकरण असल्याचं निति आयोगाचे आरोग्य गटाचे सदस्य असणाऱ्या व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही ६.५ कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, असंही पॉल म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लोकांनी दुसरा डोसही घेतला पाहिजे. नाहीतर त्यांच्यामुळे करोनाविरुद्धच्या लढ्याची साखळी कमकुवत होईल. जे लसीकरणाच्या माध्यमातून अद्याप सुरक्षित झालेले नाहीत त्यांच्याकडून संसर्गाचा धोका कायम आहे,” असं डॉ पॉल यांनी आरोग्य मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccines preventing many covid 19 deaths in third wave government scsg
First published on: 21-01-2022 at 13:30 IST