क्रिकेटच्या चाहत्यांना देशातून निघून जाण्याचा सल्ला देण्यावरुन सोशल मीडियामध्ये ट्रोल झालेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने अखेर आपले मौन तोडले आहे. ट्विटरवरुन ट्रोल करणाऱ्यांना त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच आपल्या वक्तव्याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिले आहे.