काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना तात्काळ जामीन मिळाला असला तरी लोकसभा सचिवालयाने याबाबत अधिसूचना जारी करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु यामुळे १० वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाची आठवण झाली असावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असल्यास तुटपुंजे प्रयत्न थांबवावे लागतील, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडला होता. तत्कालीन यूपीए सरकारने आणलेल्या अध्यादेशाबाबत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले होते आणि आज इतिहासाचा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून गेला असावा. खरे तर आपण डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारबद्दल बोलत आहोत. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवण्यासाठी अध्यादेश आणण्यात आला होता, तो राहुल गांधींनी फाडला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is rahul gandhi regretting now ordinance that was scrapped 10 years ago would have been a crisis solver today vrd
First published on: 24-03-2023 at 18:05 IST