काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज काश्मीरमध्ये समारोप होत आहे. समारोपाच्या कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यावेळी केलेल्या भाषणातून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान आलेले विविध अनुभव लोकांना सांगितले आहेत. यावेळी त्यांनी संपूर्ण पदयात्रेत केवळ टी-शर्टच का परिधान केला? कडाक्याची थंडी असतानाही त्यांनी स्वेटर किंवा जॅकेट का परिधान केला नाही? याचं कारण राहुल गांधींनी सांगितलं.

भारत जोडो पदयात्रेत चालत असताना घडलेला एक प्रसंगही त्यांनी यावेळी सांगितला. संबंधित प्रसंग सांगताना राहुल गांधी म्हणाले, “मी पदयात्रेत चालत असताना थंडी वाढत होती. सकाळची वेळ होती. त्यावेळी चार लहान मुलं माझ्याकडे आली. ही बाब मी सांगायला हवी की नाही, हे माहीत नाही. पण आता सांगतो. ती लहान मुलं भिकारी होते. भीक मागत होते. ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. कदाचित ते मजुरी करत असतील. म्हणून त्यांच्या अंगाला मातीही लागली होती.”

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Sanjay Raut ANI
संजय राऊत यांचा रोख कुणाकडे? “सांगलीतून कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल..”

हेही वाचा- “माझा पांढरा टीशर्ट लाल करण्याची संधी मी..” राहुल गांधी यांचं रोखठोक वक्तव्य

“ते जेव्हा माझ्याजवळ आले, तेव्हा मी त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्या समांतर येता यावं, म्हणून मी गुडघ्यावर बसून त्यांना मिठी मारली. तेव्हा मला जाणवलं, त्यांना थंडी वाजत होती. कदाचित त्यांना जेवण मिळालं नसावं. त्यावर मी विचार केला की, ही मुलं स्वेटर किंवा जॅकेट परिधान करत नसतील, तर मलाही जॅकेट किंवा स्वेटर परिधान केला नाही पाहिजे,” असं कारण राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- भर बर्फवृष्टीत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

खरं तर, भारत जोडो यात्रा दिल्लीतून उत्तरेकडे प्रवास करत असताना कडाक्याची थंडी पडली होती. सर्वत्र थंडीची लाट होती. तापमानाचा पारा घसरला होता. पदयात्रेतील अनेकजण स्वेटर किंवा जॅकेट परिधान करून मार्गक्रमण करत होती. राहुल गांधी यांनी केवळ टी-शर्ट घातला होता. यावरून राजकारणही करण्यात येत होतं. राहुल गांधींनी टी-शर्टच्या आतून गरम कपडे घातले होते, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता.