पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये दोन वेळा मंत्री राहिलेले राजीव बॅनर्जी आज भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे टीएमसी सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेत ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. बॅनर्जी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच त्रिपुराचे भाजपा आमदार आशिस दास यांनी त्रिपुरामध्ये आज अभिषेक बॅनर्जी यांच्या सभेत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “भाजपा नावाच्या विषाणूला फक्त एकच लस आहे. तिचे नाव आहे ममता बॅनर्जी. त्रिपुरातील लोकांना या विषाणुविरोधात डबल डोस द्यावा लागेल. पहिला स्थानिक निवडणुकांमध्ये आणि दुसरा २०२३च्या विधानसभा निवडणुकीत.” पुढील महिन्यात त्रिपुरातील सर्व स्थानिक निवडणुकांच्या जागांवर तृणमुल काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
What Uddhav Thackeray Said?
“आम्ही मनोज जरांगेंच्या मागे असू तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? देवेंद्र फडणवीस यांनी..”, उद्धव ठाकरेंचं उत्तर

“आम्ही त्रिपुरामध्ये डावे आणि उजवे दोन्ही संपवू. त्रिपुरामध्ये बंगाल निवडणुकांची पुनरावृत्ती होईल,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.