योगगुरु बाबा रामदेव हे सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका झाली होती. अशातच आता बाबा रामदेव यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. इस्लामचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना उचलून नेऊ शकता अथवा अन्य काहीही करू शकता, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमधील बाडरमेर जिल्ह्यातील पनोणिया येथे धर्मपुरी महाराज मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. इस्लाम धर्मात ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या अथवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा.”

Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….
Criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Mahavikas Aghadi in bhandara
“उद्धव ठाकरेंचा आम्ही खूप वर्षे अनुभव घेतला, आता काँग्रेसला त्यांच्यासोबत…” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

हेही वाचा : पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; BSF च्या हल्ल्यात कोसळलं!

ख्रिश्चन धर्माबद्दल बोलताना बाबा रामदेव यांनी म्हटलं, “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असं होत नाही. असं कुराण आणि बायबलमध्ये लिहलं नाही, मात्र असं सांगितलं जातं.”

हेही वाचा : माहिती-विदा संरक्षण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चेला; अंतिम मसुदा तयार असल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

“पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,” असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.