scorecardresearch

Premium

“इंग्रजांच्या चुकीमुळे…”, ओडिशा दुर्घटनेवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर अमेरिकेतून टीकास्त्र; म्हणाले, “वास्तव स्वीकारून…”

Rahul Gandhi on America Visit : राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील भारतीय नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. तिथे जाऊन ते मोदी सरकारवर टीकास्त्र करत आहेत.

You ask them anything they will pass the blame Rahul flays BJP-led Centre over Odisha triple train tragedy
राहुल गांधी काय म्हणाले? (संग्रहित छायाचित्र)

ओडिशाील तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असून अमेरिकेतील (स्थलांतरित) भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या एका रेल्वे अपघातवरूनही केंद्राला टार्गेट केल.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार वास्तवाला स्वीकारत नाही”, असं राहुल गांधी म्हणाले. “केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना असाच एक रेल्वे अपघात घडला होता. इंग्रजांच्या चुकीमुळे ट्रेनला अपघात झाला असे काँग्रेसने तेव्हा म्हटले नव्हते. तर, आम्ही आमची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. परंतु, भाजपा सरकार हे स्वीकरत नाही. ते सबबी काढतात आणि वास्तव स्वीकारत नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. “एवढंच नव्हे तर भाजपाला दोषारोप करणे आणि चुका न स्वीकारण्याची”ही सवय असल्यांचं राहुल गांधी म्हणाले.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

“तुम्ही त्यांना (भाजपा) काहीही विचारा. ते मागे वळून पाहतील आणि उत्तरे देतील. तुम्ही त्यांना विचारा की ओडिशातील रेल्वे अपघात कसा झाला? ते काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी काय केलं याबद्दल बोलतील”, असं राहुल गांधी म्हणाले.

ओडिशातील बहनगा बाजार स्थानकावर शुक्रवारी (३ जून) सायंकाळी भीषण अपघात घडला. बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस,कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने तब्बल २७५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. यावरून काँग्रेसने केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागितला आहे.

“२७० हून अधिक मृत्यूनंतरही मोदी सरकारने जबाबदारी स्वीकारली नाही. एवढ्या वेदनादायी अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळून जाऊ शकत नाही. पंतप्रधानांनी तत्काळ याचा शोध घ्यावा, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, असंही राहुल गांधी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You ask them anything they will pass the blame rahul flays bjp led centre over odisha triple train tragedy sgk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×