पारंपरिक कौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्राचीन परंपरा टिकवणं, नव्याने रुजवणं आणि जगभरात त्याच दिमाखात पोहोचवणं शक्य होतं हे गेल्या काही वर्षांत सातत्याने हातमाग व्यवसायासाठी केल्या गेलेल्या ठोस प्रयत्नांतून दिसून आलं आहे. हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक. देशभरातील कोटय़वधी लोकसंख्या विशेषत: ग्रामीण भागातील लोक या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. हातमाग कला आणि  त्यातून विणल्या गेलेल्या सुंदर वस्त्रांचे धागे शोधत गेलो तर आपल्याला इतिहासाशी त्यांची देखणी नाळ जोडलेली दिसते.काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशा स्थितीत पोहोचलेल्या या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या मदतीने पुन्हा एकदा लौकिक प्राप्त झाला आहे.

का साजरा केला जातो हा दिवस?

२०१५ पासून दरवर्षी आपल्याकडे ७ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची सुरुवात केली. “राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांना सलाम करतो. त्यांनी आपल्या राष्ट्राच्या स्वदेशी हस्तकलांचे जतन करण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत. आपण सर्वांनी #Vocal4Handmade बनूया आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रयत्न मजबूत करूया.” हे ट्विट २०१५ साली त्यांनी केलं होत. यामुळे अनेक कारागिरांना खूप फायदा होत आहे. आपल्या हातमागची ओळख संपूर्ण जगात होण्यास मदत होत आहे. केवळ साजरा करण्यापुरता हा दिवस मर्यादित न राहता आज हातमागाचे कपडे हे ब्रॅण्डेड म्हणून परदेशातही पोहोचविण्यात यानिमित्ताने हातभार लागला आहे.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Prakash Ambedkar on RSS PM Narendra Modi Mohan Bhagwat
‘RSS ने आम्हाला साथ द्यावी’, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन; म्हणाले, “मोदी संघाच्या मानगुटीवर…”
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
Jitendra Awhad
राष्ट्रवादीने भिवंडीची जागा काँग्रेससाठी सोडली? जितेंद्र आव्हाड म्हणाले…

एका साडीने अनेकांचा रोजगार

हातमागाची एक साडी जरी विकत घेतली तरी अंदाजे १५ कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. हातमागाचे कपडे दीर्घकाळ टिकतात. आणि आता फॅशन विश्वात होऊ घातलेल्या रिसायकल, फ्युजन कपडे अशा पद्धतीने या हातमागाच्या कपडय़ांचा पुन:पुन्हा सुंदर पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. हातमागावर विणलेल्या कपडय़ांचे महत्त्व आता कुठे लोकांच्या लक्षात येऊ लागले असल्याने आता अधिकची पदरमोड करून हातमागाचे अस्सल, सुंदर कपडे घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू वाढतो आहे.

देशभरातून सपोर्ट

देशभरात होणारी प्रदर्शने, भरवल्या जाणाऱ्या बाजारपेठा यामुळे हे कपडे सहज लोकांना उपलब्ध होऊ लागले आहेत. अगदी लॉकडाऊनच्या काळातही व्हच्र्युअल प्रदर्शनांच्या माध्यमातून ही कला पोहोचवली जात आहे आणि कारागिरांचा रोजगारही कायम राहिला. मिनिस्टरी ऑफ टेक्स्टाइलनेही वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे सातत्याने के लेले प्रयत्नही फळाला आले आहेत. सरकारी प्रकल्पांमुळे डिझायनर्स, कपडे विकणारे, बुटिक चालवणारे यांना कारागिराशी थेट संपर्क करता येणंही शक्य झालं आहे.