प्रत्येक मनुष्य हा यूनिक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. लोकांची वागणूक, त्यांच्या सवयी काही प्रमाणात सारख्या असू शकतात. पण दोन व्यक्ती कधीही पूर्णपणे समान असू शकत नाही. प्रत्येकाचे हातांचे ठसे देखील निरनिराळे असतात. हे ठसे कधीही समान नसतात. बोटांच्या ठसे हे व्यक्तीची ओळख तपासण्यासाठी वापरले जातात. पासपोर्ट, आधार कार्डसह अनेक अधिकृत कागदपत्रांमध्ये बोटांच्या ठश्यांची म्हणजेच फिंगरप्रिंट्सची माहिती नमूद केलेली असते. स्मार्टफोन लॉकसाठीही फिंगरप्रिंट्सचा वापर केला जातो.

व्यक्तीची ओळख आणि सुरक्षितता या गोष्टींसाठी बोटांच्या ठश्यांची मदत होते. पण जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या फिंगरप्रिंट्सचा वापर करता येतो का? किंवा मृत्यूनंतर ओळख पटवून घेण्यासाठी बोटांच्या ठश्यांचा वापर करणे शक्य होते का? या प्रश्नाचे उत्तर आज देणार आहोत.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मृत्यू झाल्यानंतर शरीरातील विद्युत वहन (Electrical Conductance) थांबते. आपल्या शरीरातील पेशी हळूहळू काम करणं बंद करतात. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या बोटांचे ठसे पूर्वीसारखे राहत नाहीत. मृत्यूनंतर शरीरामध्ये असंख्य बदल होत असतात. अशा स्थितीमध्ये बोटांचे ठसे मिळवणे खूप जास्त कठीण असते. काहीजणांच्या मते, मृत्यू झाल्यावर मानवांच्या बोटांचे ठसे बदलतात. हा बदल फॉरेन्सिक एक्सपर्ट शोधून काढू शकतात. मृत शरीर लॅबमध्ये नेऊन त्याचे परीक्षण केल्यावर फिंगरप्रिंट्समध्ये झालेला बदल ओळखता येतो.

आणखी वाचा – भारतात नोटा कुठे छापल्या जातात? कागद आणि इतर गोष्टी कुठून आणल्या जातात? वाचा सविस्तर

मृत व्यक्तीचे Fingerprint वापरुन त्याचा स्मार्टफोन Unlock करता येतो का?

निधनानंतर व्यक्तीच्या बोटांच्या ठश्यांचा वापर करुन त्याचा स्मार्टफोन अनलॉक करता येत नाही. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण फोनच्या फिंगरप्रिंट स्कॅनरवर बोट ठेवतो, त्यावेळी Electrical Conductance मुळे फोनचे सेंसरला बोटांच्या ठश्यांची माहिती मिळते. मृत्यू झाल्यावर विद्युत वहन पूर्णपणे थांबते. याच कारणामुळे फोन अनलॉ करता येत नाही.