जग गोल आहे असं आपण अनेकदा म्हणतो. पण जग नेमकं कुठे संपते, जगाचा अंत कुठे होतो? असा प्रश्न कधीतरी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एखाद्याला विचारायला गेलात तर तो या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. होय, असा एक रस्ता आहे जो जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. ज्याच्या पलीकडे दुसरा रस्ता नाही किंवा जागा नाही. या रस्त्यासमोर समुद्र आणि हिमनदी आहे. हा रस्ता संपताच जगाचा अंत होतो असे म्हणतात. जाणून घेऊया जगाच्या शेवटच्या रस्त्याबद्दल रंजक गोष्टी..

हा रस्ता पृथ्वीच्या टोकाला आणि नॉर्वेला जोडतो..

तुम्ही उत्तर ध्रुवाबद्दल ऐकले असते, जो पृथ्वीचा सर्वात दूरचा बिंदू आहे, जिथून पृथ्वीचा अक्ष फिरतो. नॉर्वे हा देशही आहे. येथून जाणारा रस्ता हा जगातील शेवटचा रस्ता आहे. हा रस्ता E-69 महामार्ग म्हणूनही प्रसिध्द आहे. हा असा रस्ता आहे जिथून पुढे कोणताही रस्ता नाही. यानंतर तुम्हाला समुद्र आणि बर्फ दिसेल. या रस्त्याची लांबी सुमारे १४ किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

एकट्याने जाण्यास परवानगी नाही..

जगाचे शेवटचे टोक असल्याने प्रत्येकाला हे ठिकाण कसे दिसते हे पाहायचे आहे. पण या रस्त्यावर एकट्याने जाण्यास आणि गाडी चालवण्यास सक्त बंदी आहे. वास्तविक, E-69 हा एक महामार्ग आहे, जो सुमारे १४ किलोमीटर लांब आहे. या महामार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे एकट्याने चालण्यास किंवा वाहन चालविण्यास मनाई आहे. इथे भेट द्यायची असेल तर ग्रुपने एकत्र जावे लागेल. इथे एकत्र जाण्याचे कारण म्हणजे ही जागा बर्फाने झाकलेली आहे, त्यामुळे याठिकाणी हरवण्याचा धोका असतो.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे देशातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन; नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल..)

याठिकाणी ६ महिने सूर्य उगवत नाही..

या ठिकाणाबाबत इतरही काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत. हा रस्ता उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे हिवाळ्यात नेहमीच रात्र असते आणि उन्हाळ्यात सूर्य मावळत नाही. कधी कधी या ठिकाणी ६ महिने सुर्यही दिसत नाही. म्हणजे इथे राहणारे लोक सहा महिने अंधारात राहतात. उन्हाळ्यात येथील तापमान ४३ अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस असते, तर उन्हाळ्यात सरासरी तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास असते.

हे ठिकाण जगापेक्षा खूप वेगळे आहे..

पूर्वी याठिकाणी मासळीचा व्यवसाय असायचा, मात्र १९३० नंतर हे ठिकाण विकसित होऊ लागले आणि १९३४ मध्ये येथे पर्यटक येऊ लागले. त्यामुळे लोकांना कमाईचे वेगळे साधन मिळाले. येथे तुम्हाला आता अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सही पाहायला मिळतील.