ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २४० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघाताचे हृदय पिळवटून टाकणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. शिवाय या अपघातानंतर अनेकांनी रेल्वे यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल देशभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळाला भेट देत जखमींची भेट घेतली आहे.
जगभरात कोणतीही मोठी घटना घडल्यानंतर लोकांना त्या संबंधिची माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. नुकतेच झालेल्या रेल्वे अपघातामुळे लोकांना रेल्वेशी संबंधित माहिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेल्वे रुळावरुन खाली घसरल्यानंतर ती पुन्हा रुळावार कशी आणली जाते हे दाखवण्यात आलं आहे.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.