घराणेशाहीच्या राजकारणामुळे काँग्रेस देशभरात रसातळाला जात आहे, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

पुदुच्चेरीतील यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत सरकारचे नेतृत्व करणारे व्ही. नारायणसामी यांनी १५ हजार कोटींच्या केंद्रीय निधीतून गांधी कुटुंबाला ‘कट मनी’ दिला, असा आरोप करून शहा यांनी त्या सरकारवर हल्ला चढवला.