लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील एकूण ५१ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात ६७४ उमेदवारांचे भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत. पाचव्या टप्प्यातील ५१ मतदारसंघांपैकी ३८ मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशात १४, राजस्थानमध्ये १२, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी सात, बिहारमध्ये पाच, झारखंडमध्ये चार जागांसाठी मतदान होत आहे.