Loksabha Voting: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी देशभरात सरासरी ६३.२४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसरीकडे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका निवडणूक अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपाला मतदान करा, असे आवाहन संबंधित अधिकारी मतदारांना करत होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामतीत ५२ टक्के आणि पुण्यात ४३ टक्के मतदान झाले. Total voter turnout for 3rd phase of #LokSabhaElections2019 is 63.24%. Assam - 78.29%Bihar - 59.97%Goa - 71.09%Gujarat - 60.21%Jammu & Kashmir - 12.86%Karnataka - 64.14%Kerala - 70.21%Maharashtra - 56.57% pic.twitter.com/bGbCl4G4Q3— ANI (@ANI) April 23, 2019 तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतदान झाले. यात गुजरातमधील सर्व २६, केरळमधील २०, गोव्याच्या दोन आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या एका जागेचा समावेश आहे. याखेरीज महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ तर उत्तर प्रदेशतील दहा, छत्तीसगडमधील सात आणि बिहारमधील पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर, समाज वादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा, तर वायनाड या आणखी एका मतदासंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लढत आहेत. राज्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठापणाला आहे. मंगळवारी सकाळी देशाच्या विविध भागांमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमवर समाजवादी पक्षाने शंका उपस्थित करत ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. शरद पवार यांनी देखील अशाच स्वरुपाचे आरोप केले आहे.