उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत. गोरखपूरमधून अभिनेते रवी किशन विजयी झाले आहेत. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोरखपूरमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाचा पराभव झाला होता.

बालेकिल्ल्यातील पराभव हा योगींसाठी एक झटका होता. त्यामुळे यावेळी गोरखपूरच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. गोरखपूरमधून रवी किशन ३ लाख १ हजार ६६४ मतांनी विजयी झाले.

त्यांच्यासमोर समाजवादी पार्टीच्या रामभुआल निषाद याचे आव्हान होते. गोरखपूरमधल्या प्रचारावर योगी स्वत: लक्ष ठेऊन होते. त्यांनी शक्य तितक्या सभा मतदारसंघांमध्ये घेतल्या.