Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Result : लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल (एक्झिट पोल) समोर आले आहेत. या कलांनुसार, महायुतीच पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रात काय राजकीय परिस्थिती राहिल याचाही अंदाज या कलांमधून समोर आला आहे. यामध्ये राज्यात महायुतीच्या जागा पूर्वीपेक्षा घटणार असल्या तरी तेच आघाडीवर असतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राज्यात वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात शिवसेना-भाजपा-रिपाइं-रासप यांची महायुती आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही यावेळी वेगळा जोर लावला आहे. वंचितला मिळालेल्या मतांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात वेगळा बदल दिसून येईल असे विविध राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याचा मोठा फटका काँग्रेसला बसून त्यांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, एक्झिट पोल्समधून वंचितचा प्रयोग फेल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्यक्षात २३ मे २०१९ रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हाच कोणाची देशात सत्ता येणार हे स्पष्ट होईल. Exit Poll: राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद वाढणार? Exit Poll 2019 : NDA पार करणार ३०० चा आकडा