मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात विराट सभा पार पाडली. यावेळी त्यांनी वेगवेगळया मुद्यावरुन मोदी-शाह जोडगळीला लक्ष्य केले.

राज ठाकरेंच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे
– मोदी पुन्हा निवडून आलेत तर तुम्हाला गुलाम बनवून टाकतील
नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा राजकीय क्षितिजावर दिसू नयेत यासाठी मतदान करा.
– देशाला हुकूमशाही पाहिजे की, लोकशाही हे ठरवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक.
– मोदींच्या काळात विजय मल्ल्या, नीरव मोदी, जतीन मेहता, संजय भंडारी, विक्रम कोठारी, सम्या सेठ, रितेश जैन हे भारतीय बँकांचे पैसे बुडवून परदेशात निघून गेले.
– गुजरातमध्ये भाजपाने काही केले नाही म्हणून गुजराती नागरीक गुजरात सोडून महाराष्ट्रात येत आहेत.
– मोदी आरबीआयकडून तुम्ही पैसे घेणार होता मग तुम्ही युद्ध कुठल्या जीवावर करणार होता.
– डोकलामचा संघर्ष झाला त्यावेळी चीनबद्दल राग निर्माण केला. मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून कसा आला ?
– मोदी तुमचे जैन मित्र बीफच्या निर्यात व्यवसायात आहेत तर बाकींच्या दोष का देता ?
– मोदींच्या राजवटीत बलात्काराचे अहवाल दडपून टाकण्यात आले.