समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी सांगितले की जर त्यांचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकला तर ते राज्यातील ११ लाख रिक्त सरकारी पदे भरतील आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देतील. प्रयागराज येथे एका मतदान सभेला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर राज्यातील शिक्षण आणि रोजगाराची नासाडी केल्याचा आरोप केला.

“अकरा लाख सरकारी पदे रिक्त आहेत. सपा सरकार स्थापन झाल्यावर सर्व पदे भरली जातील”, असं म्हणत अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांचा पुढे उल्लेख केला, ज्यामध्ये ३०० युनिट मोफत वीज, ६९,००० शिक्षकांची भरती अशी आश्वासने दिली आहेत.”आम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी काम करू. महिला शिक्षकांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातच पदस्थापना देण्याचे काम केले जाईल,” असे अखिलेश यादव म्हणाले.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, सपा सरकार आदिवासींना सामाजिक आणि आर्थिक लाभ देईल. आम्ही त्यांना पेन्शनही देऊ.अखिलेश यादव यांनी भाजप नेते खोटे बोलत असल्याचा आरोपही केला. “त्यांचे भाषण ऐका. त्यांचे छोटे नेते छोटे खोटे बोलतात, मोठे नेते मोठे खोटे बोलतात आणि मोठे नेते सर्वात मोठे खोटे बोलतात. ते खोटे आहेत जे आज पुन्हा तुमच्याकडे मते मागायला आले आहेत. पण सपाला मिळालेला जनतेचा पाठिंबा हे सांगत आहे की भाजपावर कठीण वेळ येईल,” असेही ते पुढे म्हणाले.

“भाजपचे सरकार येताच मोठमोठे उद्योगपती भारताचा पैसा घेऊन पळाले. आताच आणखी एक उद्योगपती २८ बँकांचे हजारो कोटी घेऊन पळाले. गरिबांना पैसे देता येत नसतील तर बँक त्यांना त्रास देते. पण काही लोक असे आहेत. पैसे घेऊन सतत पळून जातो, असे अखिलेश यादव म्हणाले.