लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार देशभरात ४०० हून जास्त जागा जिंकू, असा दावा करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाला ४०० नाही तर ३०० जागांचा टप्पा गाठणंही अशक्य दिसत आहे. खासकरून उत्तर प्रदेश, राजस्थान व हरियाणा या तीन राज्यांचे निकाल भाजपाला धक्का देणारे आहेत. महाराष्ट्रातही महायुतीची कामगिरी फार चांगली नाही. या निवडणुकांच्या निकालांवर भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी मोदींची हुकुमशाही मानसिकता असल्याचंही त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. “भाजपा कमीतकमी २२० जागा जिंकेल असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या २३७ या आकडेवारीच्या अगदी जवळ जाणारा आहे. भाजपानं माझा सल्ला ऐकला असता तर त्यांना ३०० चा आकडा गाठता आला असता. पण, दुर्दैवाने मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजपा खड्ड्यात गेली आहे, ज्यातून आता पक्षाला बाहेर पडावं लागेल,” अशी सूचक पोस्ट सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

उत्तर प्रदेशसह ‘ही’ दोन राज्ये NDA च्या हातातून निसटणार? निकालांबद्दल महाराष्ट्रातील भाजपा नेते म्हणाले, “नेमकं काय…”

आतापर्यंत हाती आलेले कल पाहता भाजपा २९१ जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीचे उमेदवार २३३ जागांवर पुढे आहेत. १९ जागांवर इतर आघाडीवर आहेत. यावर्षी ४०० हून अधिक जागा मिळवणार असा विश्वास भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला होता, पण ही आकडेवारी पाहता मतदारांच्या मनात मात्र बदलाचे वारे वाहत होते, हे स्पष्ट झालं आहे. अनेक दिग्गज भाजपा नेत्यांना काँग्रेसनी पिछाडीवर टाकलं आहे. यात ओम बिर्ला व स्मृती इराणी यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दोनवेळा अमेठीतून खासदार झालेल्या स्मृती इराणी यांना काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मांनी मागे टाकलं आहे. सुरुवातीपासूनच शर्मा आघाडीवर तर इराणी पिछाडीवर आहेत. निकालांचे कल असेच राहिले तर दोनवेळा केंद्रात मंत्री राहिलेल्या स्मृती इराणी यांना यंदा मात्र संसदेत जाता येणार नाही.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

राजस्थान व हरियाणामध्ये भाजपाने २०१९ मध्ये सर्व जागा जिंकल्या होत्या, पण इथेही चुरशीची लढत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीचे कल पाहता भाजपाला आपले गड राखता येणार नाही असंच दिसतंय. सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने जबरदस्त पुनरागमन केलं आहे, याठिकाणी सपाचे उमेदवार ३५ हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.

Story img Loader