Voting Turnout In Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम आणि मतदानाच्या आकडेवारीमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशात राज्याचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची तात्पुरती आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातील फरकाबाबत चिंता व्यक्त केली आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी ५५ टक्के दाखविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी ही टक्केवारी ६७ टक्क्यांवर गेल्याचे दाखवण्यात आले. मतदानाची ही टक्केवारी गेल्या तीन दशकातील सर्वोच्च होती.

मतदानाची टक्केवारी नोंदवण्याची प्रक्रिया

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, एस. वाय. कुरैशी म्हणाले की, मतदारांच्या मतदानाची आकडेवारी रिअल-टाइममध्ये नोंदवली जाते आणि नंतर यामध्ये होणारी ही प्रचंड तफावत चिंताजनक आहे.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?

मतदानाची आकडेवारी आणि टक्केवारी कशी नोंदवली जाते, हे सांगताना एस. वाय. कुरैशी म्हणाले, “मी जे काही पाहतोय ते नक्कीच चिंताजनक आहे. ही आकडेवारी रिअल टाइममध्ये अपडेट केली जाते. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराची उपस्थिती नोंदवतात. मतदनाच्या दिवशी शेवटी १७ सी अर्जात दिवसभरातील मतदानाची आकडेवारी नोंदवली जाते. तसेच त्यावर निवडणूक अधिकारी उमेदवाराच्या एजंटच्या सह्या घेतात. “

“फॉर्म 17सी मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले याची नोंद केली जाते. हा रिअल-टाइम डेटा त्याच दिवशी प्रकाशित केला जातो. मग दुसऱ्या दिवशी डेटा कसा बदलू शकतो ते मला समजत नाही,” असे कुरैशी पुढे म्हणाले.

हे ही वाचा : गेल्या वेळीचे ५७ हजारांचे मताधिक्य २७ हजारांवर कसे आले? जरांगे पाटलांचे नाव घेत भुजबळांनी सांगितले कारण 

निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी पुढे म्हणाले की, “या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे आणि याबाबत योग्य स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशभरात ज्याप्रकारे शंका पसरत आहेत, जर त्या प्रत्येकाच्या डोक्यात गेल्या तर निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नाही.”

राज्यात मतदानाच्या आकडेवारीवरुन गोंधळ

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्याबाबतचे काही पुरावेही त्यांना सार्वजनिक केले आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच असल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.

Story img Loader