scorecardresearch

Premium

“तुम्ही राजीव यांचे पुत्र असल्याचा आम्ही पुरावा मागितला का?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला

assam cm himanta biswa sarma targets rahul Gandhi
(फोटो- PTI)

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री शर्मा यांनी टीका केली. त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल विपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत, असे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले.

“तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? आमच्या सैनिकांनी संपावर गेल्याचे सांगितले असेल, तर पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,” असे हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

“लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला. तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा. देश आघाडीवर आहे. देशासाठी लोक जगतात आणि मरतात,” असे शर्मा यांनी म्हटले.

काँग्रेसमध्ये जीनांचा आत्मा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसने ध्रुवीकरणाच्या राजकारणात प्रवेश केला आहे, असे म्हटले. “कधी कधी मला वाटतं की जीनांचा आत्मा काँग्रेसमध्ये शिरला आहे. ते म्हणतात की मदरसे उघडणे योग्य आहे, मुस्लिम विद्यापीठे उघडणे योग्य आहे, हिजाब घालणे योग्य आहे असेही ते म्हणतात. भारत हे राष्ट्र नसून राज्यांचे संघटन आहे. त्यांचे ध्रुवीकरणाचे राजकारण संपले पाहिजे. पाच राज्यांतील निवडणुकांनंतर ते बऱ्याच अंशी संपेल, असे मला वाटते,” असे शर्मा म्हणाले.

माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावर निशाणा साधत शर्मा म्हणाले की, “हरीश रावत स्वतःला भीष्म म्हणत आहेत. त्यांना माहित आहे की ते चुकीच्या पक्षाच्या बाजूने लढत आहेत कारण कौरव पांडवांच्या लढाईत भीष्म कौरवांच्या बाजूने लढले होते. अशा परिस्थितीत आपण चुकीच्या बाजूने लढत असल्याचे हरीश रावत यांचे मत आहे. काँग्रेस पक्ष देवभूमीत मुस्लिम विद्यापीठ बांधण्याच्या गप्पा मारत तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे.”

“शाळा-कॉलेज म्हणजे फॅशन शो नाही”

कर्नाटकातील हिजाब वादावर शर्मा म्हणाले की, “कॉलेज आणि शाळेत हिजाब घालावा लागतो असे मी ऐकले होते. तुम्ही काहीही घालून जा, मला हरकत नाही. पण तुम्ही हिजाब घालून शाळा-कॉलेजात गेलात तर उद्या हिंदू बांधवही म्हणतील की आम्हाला आमचा पोशाख घालावा लागेल. अरे भाऊ, शाळा-कॉलेज म्हणजे अभ्यासासाठी, फॅशन शो नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2022 at 08:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×