जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर प्रदेशात झपाट्याने विकसित होत असलेली आणि विकासाची क्षमता असलेली शहरे म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील शहरांकडे पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्याने ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमधील पायाभूत सुविधांचा चेहरा बदलेल, असा विश्वास सातत्याने व्यक्त होताना दिसतो आहे. ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीपुरते मर्यादित राहिलेले विकासाचे केंद्र अंबरनाथ, बदलापूरच नव्हे तर उल्हासनगरसारख्या नियोजनाच्या आघाडीवर पूर्णपणे विस्कटलेल्या शहरातही सरकेल अशी आशा एकीकडे बाळगली जात असताना सरकार याविषयी खरेच गंभीर आहे का अशी शंका येण्याजोग्या घडामोडी गेल्या काही दिवसांपासून घडताना दिसत आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरच्या नगरविकास विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्याकडे सोपवून सरकार नेमका कोणता संदेश देऊ पाहात आहे, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. ही एककल्ली व्यवस्था नेमकी कोणाच्या हिताची, असा सवालही आहेच.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A single system in fourth mumbai why is the responsibility of urban development department on a single officer print exp scj
First published on: 04-06-2023 at 08:41 IST