पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर समोर आलेल्या एग्झिट पोल्समध्ये (मतदानोत्तर चाचण्यांमध्ये) उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल असा अंदाज वर्तवला आह़े. पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून येथे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्तेत येईल असा अंदाज आहे. तर उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील, त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल चाचण्यांमधून दिसतो. आता या पाच राज्यांचा कौल काय लागणार हे १० मार्चला स्पष्ट होईलच पण या निमित्ताने पुन्हा एकदा एग्झिट पोलची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. एग्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एग्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे? कशा पद्धतीने तो घेतला जातो? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एग्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एग्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
S jaishankar
“तुमच्या घराचं नाव बदललं तर ते माझं होईल का?”, अरुणाचल प्रदेशवरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला पुन्हा सुनावलं!

नक्की वाचा >> संजय राऊत म्हणतात, “एग्झिट पोल खोटे ठरतील”; खरंच असं कधी घडलंय का?, भाजपा कसा बसलेला फटका?

एग्झिट पोल कधी जाहीर केला जातो?
एग्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एग्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एग्झिट पोल जाहीर केला जातो.

कशा पद्धतीने घेतला जातो एग्झिट पोल?
एग्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.

एग्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.

ओपनियन पोलवर कितपत अवलंबून राहू शकतो?
एग्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एग्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.

एग्झिट पोलची सुरुवात कधी झाली?
एग्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एग्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एग्झिट पोल आला होता.