-अभय नरहर जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर दहा वर्षांनी होणारी देशाची आगामी जनगणना यावेळी ‘इलेक्ट्रॉनिक जनगणना’ (ई सेन्सस) असेल, असे जाहीर झाले आहे. २०२१ मध्ये करोनामुळे जनगणना होऊ शकली नव्हती. आता ती आधुनिक पद्धतीने करण्याचे सरकारने ठरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा नुकतीच केली. ही जनगणना मुख्यत्वे मोबाइलद्वारे होईल. देशातील ५० टक्के जनतेकडे मोबाइलवर आलेल्या प्रश्नावलीस अचूक प्रतिसाद देण्याची क्षमता आहे, असा दावा केला जात आहे. ही जनगणना अधिक शास्त्रीय, नेमकी आणि बहुआयामी असेल. आगामी जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होईल. ती १०० टक्के अचूक असेल. त्याआधारे देशाचा आगामी २५ वर्षांची वाटचाल निश्चित करण्यास मदत होईल, असेही सरकारचे म्हणणे आहे.  कागदावरील जनगणना थांबवून, इलेक्ट्रॉनिक जनगणना करण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. ती थोडी क्लिष्ट असेल. परंतु योग्यरित्या केल्यास ती सर्वांत सोपी सिद्ध होईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital census for india print exp scsg
First published on: 16-05-2022 at 08:09 IST