गेले अनेक महिने विशेषतः भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर भारतीय दंडविधानातील राजद्रोहाचे १२४ (अ) कलम आणि याबद्दलल असलेला राजद्रोह कायदा हा एका चर्चेचा विषय राहिला होता. सर्वोच्च न्यायालयात देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर राजद्रोह कायद्याची सुनावणी सुरू होती. आधी समर्थन करणाऱ्या केंद्र सरकारने देखील काही दिवसांपूर्वीच या कायद्याचा फेरविचार करण्याची भूमिका न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेर या कायद्यातील तरतुदींवर स्थगिती दिली आणि कायदा पूर्णपणे रद्दबातल न करता त्यातील तरतुदींबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला संसदेला दिला आहे. पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार असून तोपर्यंत राजद्रोह अर्थात कलम १२४ अ मधील तरतुदी स्थगित असतील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. असं असलं तरी हा कायदा ब्रिटीश काळापासून आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांनीही या कायद्याबद्दल परखडे मते व्यक्त केली होती.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

बाळ गंगाधर टिळक

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what tilak gandhi nehru said about ipc section 124a the law on sedition asj
First published on: 14-05-2022 at 20:44 IST