३ मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून उत्तराखंडमध्ये केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामला भेट देणाऱ्या सुमारे २३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूच्या साथीमुळे दोन वर्षांनंतर चारधाम यात्रा पूर्ण क्षमतेने संपन्न होत आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येत आहेत. प्रवासाच्या मार्गावर आरोग्य सेवेसाठी डॉक्टर, पॅरामेडिकल पथके तैनात आहेत. प्रवासी मार्गावरील वैद्यकीय युनिटमध्ये डॉक्टरांसह औषधे, रुग्णवाहिका यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही यात्रेकरुंना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

चार धाम यात्रा सुरू झाल्यापासून, मार्गात कमीतकमी २३ यात्रेकरूंचा मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित इतर समस्यांमुळे मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, यमुनोत्रीला जाताना १० यात्रेकरू, केदारनाथला जाताना सहा, गंगोत्रीला तीन आणि बद्रीनाथला जाताना एकाचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why char dham yatra is risky the elderly are most affected by the lack of oxygen abn
First published on: 15-05-2022 at 19:00 IST