– पावलस मुगुटमल / भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यात भारताचा उत्तर-दक्षिण भाग तापू लागला की उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होते. उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारे वाहू लागल्यानंतर ते उष्णता घेऊन येतात. त्यावेळी महाराष्ट्र किंवा गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांत कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती असल्यास या राज्यांतही उष्णतेची लाट निर्माण होते. यंदाच्या हंगामात मार्चमध्येच दोन टप्प्यांत उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या, ही यंदाच्या उन्हाळ्यातील वेगळी बाब समजली जाते. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता आहे. बर्फाळ आणि थंडगार प्रदेश असलेल्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशातही उष्णतेच्या लाटा आहेत. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या उन्हाच्या चटक्यांची चर्चा आहे. पण, ही चर्चा गेल्या काही वर्षांत वैश्विक झाली आहे. अगदी पृथ्वीच्या उत्तर, दक्षिण ध्रुवापासून आपले राज्य, शहर आणि गावापर्यंत उष्णतेच्या लाटेचा धोका जाणवतो आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat waves and climate change worldwide print exp 0322 scsg
First published on: 30-03-2022 at 08:53 IST