खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. भारताने हे आरोप फेटाळले आहेत. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांतील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरही ट्रुडो यांनी खलिस्तानवादी नेत्याच्या हत्येचा पुनरुच्चार केला. याच पार्श्वभूमीवर भारताने व्हिसासंबंधी कोणता निर्णय घेतला आहे? या निर्णयाचा फटका नेमका कोणाला बसणार ? हे जाणून घेऊ या…
कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे थांबवण्याचा निर्णय
कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र खात्याने गुरुवारी जाहीर केले. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या आधी बुधवारी (२० सप्टेंबर) भारताने कॅनडात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. भारतविरोधी वाढत्या कारवाया, तसेच राजनैतिक तणाव लक्षात घेता भरताने हा इशारा दिला आहे.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India hold issuing new visa to canadian nationals what will happen next prd