कर्नाटकच्या सिनी शेट्टीने मिस इंडिया २०२२ चा खिताब जिंकला आहे. सोशल मीडियावर सिनी शेट्टीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण मिस इंडिया म्हणजे नेमकं काय? ही स्पर्धा कशी जिंकतात? त्यासाठी काय करावं लागतं. ही स्पर्धा कधीपासून सुरु झाली हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर घ्या जाणून.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

मिस इंडिया स्पर्धा काय आहे?
मिस इंडिया किंवा फेमिना मिस इंडिया ही भारताची राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. फेमिना ग्रुप दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते. याद्वारे मिस वर्ल्डसारख्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांची निवड केली जाते.

पहिली मिस इंडिया
कोलकात्याची प्रमिला पहिली मिस इंडिया ठरली. १९४७ मध्ये त्यांनी हे विजेतेपद पटकावले होते. स्थानिक पत्रकारांनी याचे आयोजन केले होते. १९६४ मध्ये पहिल्यांदा फेमिना मिस इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या मेहर कॅस्टेलिनो हिने पहिला फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावला. यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली.

फेमिना मिस इंडिया ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत होती. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. तेव्हापासून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात.

मिस इंडिया होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे
मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. तुमची उंची ५ इंच ३ फूट असेल तेव्हाच तुम्ही मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊ शकता. तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट देखील असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही अविवाहित असणे आवश्यक आहे.

पाहा व्हिडीओ –


मिस इंडिया स्पर्धा जिंकण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. मिस इंडिया होण्यासाठी केवळ सौंदर्यच आवश्यक नाही, त्यासाठी चालू घडामोडींची पूर्ण माहिती असणेही खूप गरजेचे आहे. चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे चांगले ड्रेसिंग कौशल्य देखील असणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने चालायलाही हवे. तुमचे स्मार्ट आणि ट्रेंडी असणे देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी उपयुक्त आहे.

मिस इंडिया स्पर्धेसाठी अर्ज कसा करावा
यासाठी तुम्हाला मिस इंडियाच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा. यामध्ये तुम्हाला तुमचे तीन व्हिडिओ देखील टाकावे लागतील. एक परिचय, दुसरी रॅम्प वॉक, तिसरी तुमचे गुण. यामध्ये तुमचे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारा व्हिडिओही आवश्यक आहे. यासोबतच जन्मस्थळ, सद्यस्थिती, मूळ राज्य, उंची यासंबंधीची कागदपत्रेही येथे अपलोड करायची आहेत. यानंतर, उर्वरित अटींची पूर्तता केल्यानंतर, तुम्ही सबमिट वर क्लिक करू शकता. यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

मिस इंडिया झाल्यानंतर काय मिळते?
मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर एक लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतात. याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही ओळखही मिळते.
फेमिना मिस इंडिया स्पर्धा दरवर्षी जून महिन्याच्या आसपास आयोजित केली जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss india tips to qualify in miss india pageant what are the rules and process dpj
First published on: 04-07-2022 at 19:48 IST